डॉ. कीर्ती सचिन नांदेडकर, लक्ष्मी आयुर्वेद क्लिनिक, पुणे
पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढते, जठराग्नी मंदावतो आणि वात दोषाचा प्रकोप तर पित्ताचा संचय होतो. याचा परिणाम केस व टाळूच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे केस गळणे, कोंडा, खाज येणे, बुरशीजन्य संसर्ग, टाळूला दुर्गंधी येणे, केस चिकट होणे आणि अकाली पांढरे होणे अशा समस्या वाढतात. योग्य आयुर्वेदिक दिनचर्या आणि आहाराने या समस्या मोठ्या प्रमाणात टाळता येतात.
पावसाळ्यात वाढलेली आर्द्रता, अपुरी सूर्यप्रकाशाची उपलब्धता, दूषित पाणी, अपुरी झोप, ताणतणाव, अपचन आणि अयोग्य आहार यामुळे केसांच्या मुळांचे पोषण कमी होते. त्यामुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते.
भृंगराज, आमलकी, ब्राह्मी, यष्टीमधु, त्रिफळा, नारसिंह रसायन, च्यवनप्राश यांसारखी औषधे किंवा रसायन चिकित्सा प्रकृतीनुसार उपयुक्त ठरू शकते. औषधे स्वतःहून न घेता आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
जर दिवसाला १०० पेक्षा जास्त केस गळत असतील, टाळूवर गोल चट्टे पडत असतील, तीव्र खाज, पू किंवा संसर्ग दिसत असेल, तर त्वरित आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास केसांचे नुकसान टाळता येते.
"सुंदर केस हे केवळ सौंदर्याचे नव्हे तर उत्तम आरोग्याचेही प्रतीक आहेत. पावसाळ्यात योग्य आयुर्वेदिक काळजी घ्या आणि केसांना निरोगी, मजबूत व दाट ठेवा."
डॉ. कीर्ती सचिन नांदेडकर, लक्ष्मी आयुर्वेद क्लिनिक
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, जठराग्नी मंद होतो, वात दोषाचा प्रकोप होतो आणि पित्ताचा संचय होतो. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अपचन, अॅसिडिटी, सांधेदुखी, त्वचारोग आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. योग्य आहार, विहार आणि आयुर्वेदिक दिनचर्या पाळल्यास हे आजार टाळता येतात.
"ऋतुनुसार आहार-विहार पाळणे हेच आयुर्वेदातील सर्वोत्तम प्रतिबंधात्मक औषध आहे. पचनशक्ती चांगली ठेवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा आणि पावसाळा निरोगीपणे अनुभव करा."